Posts

Showing posts from November, 2016

पुस्तके का वाचावीत?

वाचाल तरच वाचाल ! 1- महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट  म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले  "राईट्स ऑफ मॅन "नावाचे पुस्तक या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली.  2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ त्यांच्या  गुरूजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र  हे पुस्तक आहे.  3- भगतसिंग यांना इंग्रजानी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग  यांना विचारले की "तुला तर उदया   फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक  वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग  जेलरला म्हणाले की "माझ्या  वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील ". 4- भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते. 5 - वाचन हा शब्द  कसा तयार झाला?   वचन- म्हणजे शपथ ; एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा  त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार शपथ चा अर्थ - श- शतक ; 100 टक्के  पथ- मार्ग

ब्रिटिश आणि भारतीय मानसिकता

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीने ब्रिटनचे साखरेने भरलेले जहाज बॉम्ब टाकून समुद्रात बुडवले, ब्रिटिश रेडीओने जनतेला अवाहन केले की काही दिवस साखरेचा तुटवडा भासणार आहे. तेंव्हा जनतेने काय केलं माहित आहे? ज्याच्या घरी जास्त साखर आहे त्यांनी काही आठवड्याचा साठा ठेवून उरलेली साखर दुकानदाराला परत केली जेणेकरून ती गरजूंना मिळावी आणि देशबांधवांना अडचण येणार नाही. दुकानदारांनी पण काळाबाजार न करता ती साखर आहे त्या भावाने विकून टाकली. हे कारण आहे की अजुन पर्यंत कोणी ब्रिटनला गुलाम करु शकले नाही. 'Rule Britannia rule the waves Britisher will never slaves' अशी प्रजा असलेला देश बलशाली असणारच ना! मीठ तुटवड्याच्या एका अफवेने देशाच्या जनतेचे चारित्र्य उघड पाडले. देश महान करण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर त्यात जनतेचे पण योगदान असावे लागते, विश्वगुरु बनण्यासाठी अगोदर त्या योग्यतेच बनावे लागते बोलक्या पोपटासारखे फक्त वंदेमातरम बोलुन भारत विश्वगुरु होणार नाही. आपल्याला त्या योग्यतेच बनावे लागेल आपले विचार पण व्यापक बनवावे लागतील.